झाली स्वप्नांची माती, अन भावनांचा चिखल
अश्रूंच्या महापुरात, संसार तरी कसा टिकलं
पुसटशी आशा ही, आता देवा कुठेच दिसेना
विखुरलेल्या घराची घडी, काही केल्या बसेना
डोळ्यादेखत वाहून गेले, जे होतं साठवणीतलं
जपलेले उराशी आता, झालं रे आठवणीतलं
वादळात हरवल्या कशा, वाटा आज साऱ्या
नशिबाच्या पाट्या झाल्या, अचानक कोऱ्या
मागमूस लावताना जीव, पिळून च गेला
एक क्षण त्या घडीला, काटा अंगावर आला
लाटा झेलत झेलत आता, स्वर्गची गाठला
नांव आशेची घेऊन तेव्हा, देवच भेटला
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment