जाणिवा साऱ्या होतील ज्वलंत
जेव्हा गोंधळ मनीचा होईल शांत
मन तेव्हा मग भासेल निवांत
एक क्षण वाचेन मी तेव्हा तुला
मळभ काळा होईल तो दूर
सरून जाईल भावनांचा पूर
लागतील अवचित एक सूर
एक क्षण वाचेन मी तेव्हा तुला
प्रयत्नाचा डोंगर अलगद सर होईल
कंठ मनीचा अचानक दाटून येईल
मन माझे तेव्हा पाखरू होईल
एक क्षण वाचेन मी तेव्हा तुला
नाही म्हणत दिवस ही सरतील
काठ डोळ्यांचे अश्रूंनी भरतील
सोबत तेव्हा फक्त आठवणी उरतील
एक क्षण वाचेन मी तेव्हा तुला
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment