बोलत नाही तो कधीच
चूक तुझी ही नाही ...
कळी फुलणार होती
पण फुल राजी नाही ...
बोलत नाही तो कधीच
पानगळ झाली कशी...
मोहर आला होता
बहर आला नाही ...
बोलला असता तो तर
कळी फुलली असती ...
पानगळ झाली नसती
पुन्हा ती मोहरली असती ...
पण बोलत नाही तो कधीच...
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment