भेगाळलेलं शिवार त्यात भावनांची कोरड
खरवडलेल्या घशाची पाण्यासाठी तडफड
दारिद्र्याचे वास्तव रोज रोज सलत
प्रश्न पडतात मनाला पण उत्तरं काही मिळत नाही
मातीतली ठिगळं त्यात रुतलेले तन
अंधारात बुडलेला विहिरीचा तळ
कोलमडून बळीराजा कसा काय हरतो
जवळ करतो मृत्यू त्याला जगण का दिसत नाही
वकिलाचा मुलगा वकील, डॉक्टरचा डॉक्टर
नाहीतर इंजिनीअर नाहीतर कलेक्टर
काहीच नाही तर नुसता पदवीधर
शेतकऱ्याच्या पोराला मात्र असे का वाटत नाही
कधी बरसणार तो या नव्या उमेदीवर
जेव्हा रेताडलेल्या मातीतून अंकुर फुटते धरणीवर
निसर्गच शिकवतो जगण्याचे सत्वर
उत्तरं असतात समोर पण प्रश्न काही संपत नाही ...
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment